या जिल्ह्यांतून जाणार शक्तीपीठ महामार्ग तुमचा जिल्हा आहे का? यादी चेक करा Shaktipeeth Highway district List

Shaktipeeth Highway district List: महाराष्ट्राच्या विकासाला एक नवी दिशा देणारा आणि सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे नागपूर ते गोवा जोडणारा शक्तीपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway). हा सहा-पदरी द्रुतगती महामार्ग केवळ प्रवासाचा वेळ कमी करणार नाही, तर राज्यभरातील धार्मिक आणि आर्थिक विकासालाही गती देणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या चारही विभागांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे राज्याचा विकास निश्चितच वाढणार चर्चा सध्या राज्यात सुरू आहे.

शक्तीपीठ महामार्गाची वैशिष्ट्ये आणि धार्मिक महत्त्व

या महामार्गाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून होणार असून तो थेट गोव्याच्या पत्रादेवीपर्यंत जाणार आहे. यामुळे सध्या नागपूर ते गोवा प्रवासाला लागणारे १८ ते २० तास कमी होऊन हा प्रवास फक्त ७ ते ८ तासांत पूर्ण होणार आहे.

या महामार्गाला ‘शक्तीपीठ’ हे नाव देण्यामागे एक महत्त्वाचे कारण असल्याचे बोलले जात आहे. हा मार्ग महाराष्ट्रातील प्रमुख देवींच्या स्थानांना जोडणार आहे. यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता आणि सप्तशृंगी देवी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ आणि नांदेडचा गुरुद्वारा यांसारख्या प्रमुख तीर्थस्थळांनाही या मार्गामुळे जोडणी मिळणार आहे, ज्यामुळे भाविकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

२६ लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार, तुम्ही पात्र कि अपात्र? यादी चेक करा Ladki Bahin Yojana
२६ लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार, तुम्ही पात्र कि अपात्र? यादी चेक करा Ladki Bahin Yojana Qualification Status

या १२ जिल्ह्यांमधून जाणार महामार्ग

तुम्ही जर या भागातील रहिवासी असाल, तर तुमचा जिल्हा या यादीत आहे का ते तपासा:

  • वर्धा
  • यवतमाळ
  • नांदेड
  • हिंगोली
  • परभणी
  • बीड
  • लातूर
  • धाराशिव (उस्मानाबाद)
  • सोलापूर
  • सांगली
  • कोल्हापूर
  • सिंधुदुर्ग

हा प्रकल्प सुमारे ८,६१५ हेक्टर जमिनीवर उभारला जाणार असून, तो ३७१ गावांतून जाणार आहेत. या प्रकल्पाची अंमलबजावणी MSRDC करत असून, भूसंपादनाचे काम वेगात सुरू आहेत.

शेतकऱ्यांचा विरोध आणि सरकारची भूमिका

या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादित केली जात असल्यामुळे काही शेतकऱ्यांकडून विरोध होत आहेत. विशेषतः कोल्हापूर आणि परभणी जिल्ह्यांतील शेतकरी आपल्या सुपीक जमिनी गमावण्यास तीव्र विरोध करत आहे. त्यांना मिळणारा मोबदला अपुरा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहेत.

बांधकाम कामगारांना 12,000 रुपये; तुम्ही पात्र आहात का? चेक करा Bandhkam Kamgar Yojana List
बांधकाम कामगारांना 12,000 रुपये; तुम्ही पात्र आहात का? चेक करा Bandhkam Kamgar Yojana List

यावर सरकारने बाजारभावाच्या तिप्पट मोबदला देण्याचे आश्वासन दिलेले आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांना आपल्या भवितव्याची चिंता अजूनही सतावत आहेत. त्यामुळे शासन आणि शेतकरी यांच्यामध्ये योग्य संवाद साधून न्याय्य तोडगा काढणे आवश्यक आहेत.

प्रकल्पाचे फायदे आणि आव्हाने

फायदे:

  • वेळेची बचत: नागपूर ते गोवा प्रवास खूप कमी वेळेत पूर्ण होईल.
  • आर्थिक विकास: विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल.
  • रोजगार: महामार्गाच्या बांधकामामुळे आणि पुढील व्यवस्थापनामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
  • पर्यटन: प्रमुख धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणी मिळाल्याने पर्यटनात वाढ होईल.

आव्हाने:

इंडियन नेव्ही मेगाभरती 1315 जागा 10 वी पास सरकारी नोकरी पगार 63 हजार रु Indian Navy Bharti 2025
इंडियन नेव्ही मेगाभरती 1315 जागा 10 वी पास सरकारी नोकरी पगार 63 हजार रु Indian Navy Bharti 2025
  • भूसंपादन: शेतकऱ्यांची जमीन गमावण्याची भीती आणि मोबदल्याचा प्रश्न हे एक मोठे आव्हान आहे.
  • पर्यावरण: १२८ हेक्टर वनजमिनीचा वापर होणार असल्याने पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

निष्कर्ष: शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचा आणि बदल घडवणारा प्रकल्प ठरू शकतो. मात्र, विकासाचा हा वेग कायम राखत असतानाच, शेतकऱ्यांचे हित आणि पर्यावरणाचा समतोल राखणे ही शासनाची एक मोठी जबाबदारी असेल.

Leave a Comment